Wednesday, May 28, 2008

...थेंब पावसाचे...

...स्वरवेडा...

तुझ्या शब्दांना अर्थ देण्या....

येशील??म्हणजे....
तुझ्या या आर्त हाकेला तरी मला साद द्यावीच लागेल....
आणि सख्या.... मी नाही दिली तरी...
माझे सुर...माझे सुर कसे दुर पळू शकतील...
मला यावचं लागेल....
तुझ्या शब्दांना माझा सुर द्यावाच लागेल...
येईन मी...तुझ्या शब्दांना सुर देण्या...
तुझ्या शब्दांना अर्थ देण्या....
माझ्या सुरांनी तुझे शब्द पुन्हा बहरतील..
अन तुझ्या शब्दांमूळे माझे सुर...
मला पुन्हा नव्याने गवसतील....
तुझ्यासाठी...तुझ्या शब्दांसाठी....
मी परत येईन...
तेव्हा होईल.... तुझ्या शब्दांचा अन माझ्या सुरांचा नवीन जन्म
होईल ना??????

....सई(सुप्रिया पाटील)

फ़क्त तुझ्याच शब्दांसाठी....

माझ्या राजा...असं नाहीये काही...
:
:
:
सुर खुलुन येतात माझे
कारण त्यांना साज देतात शब्द तुझे
तुझ्या शब्दांतून तु माझ्या ्सुरांना
एक नवा अर्थ देतोस...
अन त्यातुनच आपल्या सुंदर आयुष्याच गाणं निर्माण करतोस...
खरतरं तुझे शब्द आहेत म्हणून गाते मी...
माझे सुर जन्म घेतात...
ते फ़क्त तुझ्याच शब्दांसाठी...फ़क्त तुझ्याचसाठी...

....सई(सुप्रिया पाटील)

...जीवनगाणं...

मी नाही एकटा पुर्ण करत तुझं गीत
त्यापेक्षा आपण दोघांनी मिळुन
आपल ’जीवनगाणं’ लिहुया...
त्याला योग्य रागात बसवुन...
तुझे अन माझे स्वर जुळवुन गाउया...
;
;
ऎ राणी.....सांग ना?माझी होउन गाशील ना माझ्यासोबत?
तुझे सुर माझ्या स्वरांत मिसळुन.....
करशील ना आपल जीवनगाणं पुर्ण???सांग ना राणी....???

....सई(सुप्रिया पाटील)

...मीच मी...

कुठं गं एकट टाकलयं तुला....
तुझ्यातच आहे मी
जरा नीट शोध मला....
तुझ्या प्रत्येक स्वरात मी....
’सप्तक’ स्वरात ढाळताना
’सा’ पासुन ’नी’ पर्यंत मीच मी....
तुच म्हणतेस ना....
तुझ्या श्वासातही मीच मी....

....सई

Monday, May 12, 2008

...आंधळ्यांचं जग...

बघु न शकणार्‍या व्यक्तींच मनोगत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न...कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतु नाही.



...विचार...

विचार..... बाई गं...कधीच पाठ सोडत नाहीत कोणाची...
कसला ना कसला विचार चालुच असतो प्रत्येकाच्या मनात....कोणी अभ्यासचा विचार करतं... तर कुणी नोकरीचा....कुणी मुलाबाळांचा तर कुणी बायकोचा......कुणी फ़क्त स्वताचा ,तर कुणी निःस्वार्थी होउन फ़क्त दुसर्‍यांचा..आणि एखाद्याला विचार करायला काहीच विषय नसेल तर दुसरं कुणी कसला विचार करतयं याचाचं विचार पडलेला असतो.... विचार करायला विषय कधी कमी पडलेच नाहीत माणसाला.... शांतता तर अजिबात नाही मनाची....नेहमी आपली गर्दी विचारांची....ही विचारांची शृंखला कधी थांबायचं नावचं घेत नाही मुळी.....नुसता आपला कसला ना कसला विचार....कंटाळा येतो बाई विचारांचा...सोडा ना कधीतरी शांत,निवांत...पण नाही.... असं कधी होतचं नाही...
म्हणतात बुआ....ही विचारांची शॄंखला म्हणे झोपल्यावर थांबते...खरचं का????
मला नाही वाटत असं.....
झोपतं ते फ़क्त शरीर....विचार तर छळतातचं की मनाला....स्वप्नांच्या रुपात....हो ना??????

..........सई(सुप्रिया पाटील)