Thursday, July 2, 2009

पत्रास कारण की,

"सखे तुला माझ्यापेक्षा चांगला कुणी भेटला असता असा कधी तु विचार केलायस का ग?????"असा प्रियचा प्रश्न ऎकुन सखी थोडी चकीतच झाली...याला काय झालं मधेच असा भाव तिच्या चेहर्‍यावर आला...आता हे भाव त्याला दिसत नव्हतेच कारण नेहमीप्रमाणे संभाषण फ़ोनवर सुरु होतं.....तिनं त्यावेळी तो विषय टाळला...पण नंतर ऑफ़िसवरुन घरी आल्यावर थोडा निवांत तिनही त्याच्या त्या प्रश्नावर विचार करायला सुरुवात केली...आणि उत्तराखातर प्रियला पत्र लिहायला घेतलं.

प्रिय,
कसा आहेस?सहजच वाटलं पत्र लिहावसं....आता म्हणशील रोज तर बोलतो फ़ोनवर मग मधेच पत्र लिहीण्याची लहर(सवड) कशी काय मिळाली बुआ....असो....रोज कितीही बोललो म्हणजे मला मान्य आहे हल्ली आपण पुर्वीसारखं बोलत नाही तरीही.....काही गोष्टी बोलुन सांगण्यापेक्षा मला वाटलं आज पत्रातुन व्यक्त व्हावं...त्यामुळे आता आश्चर्याचे भाव ओसरू द्यावेत अन थोडं नॉर्मल होऊन पत्र वाचवं....

तर पत्र लिहीण्यास कारण की,
आज तुम्ही बोलता बोलता एक प्रश्न विचारलात की,""सखे तुला माझ्यापेक्षा चांगला कुणी भेटला असता असा कधी तु विचार केलायस का ग?????"तेव्हाचा माझा चेहरा बघितला असतास ना तर तुलाही माझे ते भाव कळले नसते...असा का प्रश्न तुला पडावा रे?

Practically ह्या प्रश्नाच उत्तर द्यायचं म्हटलं ना तर मला सरळ वाटतं की,ह्या जगात कुणीही परिपुर्ण नसतो,तसच कुणाचाही जोडीदार हा त्याला १०० टक्के अनुरुप कसा मिळू शकतो,एकात जे कमी आहे ते दुसर्‍याने पुर्ण करायच असतं तरच ते नातं परिपुर्ण होऊ शकतं.माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा तु आहेस कधी कधी या गोष्टीचा आपल्या दोघांनाही त्रास होतो पण,माझ्यात जे नाही ते मला तुझ्यात सापडलं किंवा तुझ्यात जे नाही ते तु माझ्यात शोधतोस आणि आपलं नात फ़ुलवतोस परिपुर्ण करण्याचा प्रयत्न करतो हे महत्वाच नाही का? आणि खरं सांगायच तर तुला कुणी परी जरी मिळाली आणि मला कुणी "परा" मिळाला ना तरी तिथही वाद,भांडणं होतच राहणार coz nobody is perfect.

मला कधी असा प्रश्नच पडला नाही कारण तुझं माझ्यावरच असलेलं प्रेम,तुझं मला समजुन घेणं...माझ्या चिडण्याला,माझ्या रागवण्याला bare करणं....jokes apart.....पण खरचं तुझ्यापेक्षा चांगला कुणी मला भेटला असता की नाही देव जाणे पण देवाने माझ्यासाठी उत्कृष्ट असा तुच पाठवला आहेस.(कारण माझी बडबड,चिडचिड तुझ्या व्यतिरिक्त कुणीच सहन करु शकत नाही.)

काळजी घ्यावी...नेहमीप्रमाणे खुप आठवण येतेय तुझी....लव्ह यु....

तुझ्या माझ्या नात्याला, नाही अंतराची बंधनं
नाही दुराव्याचे दुःख...नको स्पर्शाची आस...
नाही झाला संवाद जरी,तरी आहे विश्वासाची वीण,
जी प्रत्येक क्षणासोबत अजुनच घट्ट होतेयं....
कुठलीतरी अनामिक "सय", जुळलीये आपल्यात,
म्हणुनच श्वासागणिक, येते तुझी आठवण....
अन करते मनात...तुझी तुझीच साठवण....

तुझीच वेडी,
सखी.