अनामिक ओढ
नीरव अशा सांजवेळी,
श्वासा-श्वासासोबत
तुझेच नाव...
मनाला लागलेली
वेडी हुरहुर...
सहनतेच्या पलिकडे
जाऊन वाट बघणार...
पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच
धाव घेणारं...
माझ्याही ताब्य़ात न राहीलेलं..
माझ्यापासुन दुर होऊन
केव्हाचच तुझ झालेलं
आणि आता विरहात,
रडणारं....
अबोलीच फ़ुल झालेलं..
एककी झालेल माझ मन....
याच एका प्रश्नात,
"तुलाही येत असेल रे माझी इतकीच आठवण???"
...सई
Saturday, August 15, 2009
Sunday, August 9, 2009
ये दिल always मांगे more...!!!
सार काही वेळेवर,सुखदायक काय म्हणतात ते without tension होत असतानाही...मनाला गप्प अस बसवतच नाही.उधाणलेलंच असत सतत....सारं काही ठीक चाललेल असताना उगाच घोडे उधळावेत तसेच हे स्वप्नांचे ताशेरे उधळतं...गुरफ़टण्याची हौस उगाचची लागलेली असते अन त्यामुळेच साध सरळ चाललेल आयुष्य उगाच complicated होऊन बसतं,कुठतरी कळत असत नाही जे वागतोय ते चुकीच आहे पण नाही...मनाला हे सार कळत पण वळत मात्र नाही.आणि म्हणुनच चांदण्यांनी भरलेल आभाळ असुनही ते रितच भासत राहत...आणि ते भरण्याचा उगाचचा प्रयत्न चाललेला असतो...ये दिल ना always want more यार...!!!
जे काही जवळ आहे त्यापेक्षा नेहमीच जास्त हवं असतं,मग जवळ असलेलं पुरेस का असेना.एखादी गोष्ट पुर्ण आपल्याकडे असताना काहीच अडत नसतानाही अजुन चांगलच का हव असतं...याच शोधात भरकटत मन सतत...सतत मृगजळाच्या मागे धावण्यात काय मजा येते देव जाणे.
कधी कधी तर आपल्याला हवी असलेली गोष्ट कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला मिळणार नाही हे माहीत असुनही त्याच गोष्टीचा विचार करत मन उगाच गुंतत जात.आणि मग नाही मिळाली ती गोष्ट की उगाचच कुढत बसतं.
नात्यांचही तसच आहे,समोरची व्यक्ती आपल्या मनासारखी वागत नाही अस आपण नेहमीच म्हणतो पण,ती व्यक्ती कितीही चांगलं वागली तरी आपल्याला काहीतरी जास्तच हवं असतं.यातुनच मग अबोला,रुसवे,भांडणं आणि तंटे हा गुंता निर्माण होतो आणि तो सोडवताना पुन्हा आपलीच ओढाताण होते.
एखादा आभाळाएवढं प्रेम देणारा जरी असेल ना तरी प्रेम घेणार्या व्यक्तीला ते आभाळापेक्षा तसुभर का होईना पण जास्तच हव असतं,या मनाला नेहमी आहे त्यापेक्षा काहीतरी जास्तच हव असतं.
नसीब से ज्यादा और वक्त से पहले
कुछ हासिल तो नही होगा
ये मालुम होके भी..क्यु??
ये दिल always मांगे more...!!!
जे काही जवळ आहे त्यापेक्षा नेहमीच जास्त हवं असतं,मग जवळ असलेलं पुरेस का असेना.एखादी गोष्ट पुर्ण आपल्याकडे असताना काहीच अडत नसतानाही अजुन चांगलच का हव असतं...याच शोधात भरकटत मन सतत...सतत मृगजळाच्या मागे धावण्यात काय मजा येते देव जाणे.
कधी कधी तर आपल्याला हवी असलेली गोष्ट कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला मिळणार नाही हे माहीत असुनही त्याच गोष्टीचा विचार करत मन उगाच गुंतत जात.आणि मग नाही मिळाली ती गोष्ट की उगाचच कुढत बसतं.
नात्यांचही तसच आहे,समोरची व्यक्ती आपल्या मनासारखी वागत नाही अस आपण नेहमीच म्हणतो पण,ती व्यक्ती कितीही चांगलं वागली तरी आपल्याला काहीतरी जास्तच हवं असतं.यातुनच मग अबोला,रुसवे,भांडणं आणि तंटे हा गुंता निर्माण होतो आणि तो सोडवताना पुन्हा आपलीच ओढाताण होते.
एखादा आभाळाएवढं प्रेम देणारा जरी असेल ना तरी प्रेम घेणार्या व्यक्तीला ते आभाळापेक्षा तसुभर का होईना पण जास्तच हव असतं,या मनाला नेहमी आहे त्यापेक्षा काहीतरी जास्तच हव असतं.
नसीब से ज्यादा और वक्त से पहले
कुछ हासिल तो नही होगा
ये मालुम होके भी..क्यु??
ये दिल always मांगे more...!!!
Sunday, August 2, 2009
Subscribe to:
Posts (Atom)