Tuesday, August 3, 2010

पुन्हा नव्याने.....प्रेम....

माझ्या मनात रुजलेली,
तुझी हरएक आठवण....
तुझ्या सहवासात सजलेला
जगलेला...प्रत्येक क्षण...
हे सारचं कसं....
नेहमीच पुन्हा नव्यानं जन्मलेलं.....
प्रत्येकवेळी तितकचं नाविण्य...
तितकीच ओढ घेऊन मनात येतं....
अन मग मनाची पाऊलं घेतात धाव ...
तुझ्याच दिशेनं....
अगदी बेभान होऊन....
तु माझाच आहेस हे ठाऊक असुनही....
का? तुझ्याच अस्तित्वाचा शोध घेत रे मन....
प्रत्येक वस्तुत...प्रत्येक अणु-रेणुत....
तुझ्या असण्याचा भास होतो मनाला....
प्रत्येक क्षणाला तुझ्या प्रेमात पडते मी जणु....
पुन्हा नव्याने.....

....सई

Wednesday, June 9, 2010

रिमझिम पावसात

रिमझिम रिमझिम पावसात
चिंब होत भिजताना....
शहारतं मन असं... जसं
तुझ्या आठवात रुजताना....

बरसणार्‍या सरीमधुन हलकेच
थेंब तळहातावर झेलताना....
ओलावतं मन असं...जसं
तुझ्या मिठीत थिजताना....

रुणझुण बरसणारा पाऊस
पैंजणात अडकताना.....
झंकारतं मन असं...जसं
तुझ्या स्पर्श अनुभवताना...

.....सई(सुप्रिया पाटील)

Tuesday, February 9, 2010

प्रिय सखीस,

सखे,
फ़ार पुर्वी कुठतरी वाचलं होत,की प्रेमात पडल्यावर मुलाच जग काहीच बदलत नाही,पण मुलीच सगळं जग त्या एका व्यक्तीबोवतीच गुरफ़टुन राहतं.....आज प्रकर्षानं हे खरच आहे अस जाणवलं......खरच किती बदलतो आपण प्रेमात पडल्यावर,आपला जोडीदार कितीही समजून घेणारा असला किंवा किती स्पेस देणारा असला तरीही....तरीही....बदल हे होतातच......
आज एक मुलगी म्हणुन हे सगळं जाणवतयं....मला त्याच्याशिवाय अस काही विश्वच उरलेलं नाही.....सगळ जग त्याच्याच अवतीभवती सामावलेलं आहे.....प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट करताना....काही करण्याच्या विचारही करताना पहीला विचार त्याचा येतो...त्याला काय वाटेल...नाहीतर तो काय म्हणेल.
तो मला खुप समजुन घेतो....मी त्याच्याशी सगळं शेअरही करते...पण कधी काही गोष्टी एखाद्या जवळच्या मित्राला वा मैत्रीणीला सांगाव्याशा वाटल्या तर मला तस कुणी उरलच नाहीये हे कळुन चुकतं....
प्रेमात पडल्यामूळे इतर नात्यांवर परिणाम का व्हावा हेच कळत नाही....पुर्वीसारखं मित्र-मैत्रीणींशी भेटणं होत नाही...त्यांच्याशी फ़ोनवर बोलणही होत नाही...इतक का विश्व तोकडं व्हावं....आणि हे सगळं आम्हा मुलींच्याच बाबतीत का बरे?????
याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याबरोबर खुष नाहीये...पण माझी इतर नाती कुठतरी हरवलीयेत....असलेल्या नात्यांची वाढ कुठतरी खुंटलीये....इतकं माझ विश्व फ़क्त त्याच्याच साठी उरलयं.....
खुप खुप प्रेम करते मी त्याच्यावर...पण त्याच्या अशा दुर असल्यामुळे...आमच्या वेळा जुळत नसल्यामुळे मला जेव्हा अचानक व्यक्त व्हायच असतं किंवा कुठं भटकायला जायचा मुड असल्यावर ते जायला न मिळणं याचच फ़ार वाईट वाटतं...आणि आता कुणाशी तितकासा संपर्क नसल्यामुळे उरते फ़क्त मी एकटी.....
खुप कंटाळा येतोय आता मला या विरहामुळे आलेल्या माझ्याच मॅच्युरिटीचा.....अल्ल्ड व्हावसं वाटतयं....पुन्हा मित्र-मैत्रीणींसोबत हुंदडावस वाटतयं.....
माझं त्याच्या सोबतच पण वेगळ असही काही अस्तित्व आहे हे माझंच मला उमगलयं आता...तेच अस्तित्व मला जगावसं वाटतयं....
सखे तुलाही वाटतच असेल ना??????

वाटतयं का गं तुलाही....
कर्तव्यात अडकण्यापुर्वी...
मोकळे काही श्वास घ्यावासे....
पुन्हा फ़ुलपाखरु होऊन ....
अल्लड रंगात रंगावेसे...
वाटतयं ना....???


...सई

Sunday, November 15, 2009

भावनाशुन्य

कधीतरी शुन्यात जातं मन....अगदीच काही न केल्यामुळे...नाहीतर खुप काही केल्यामुळे....


मनात खोल खोल
दडलयं काहीतरी...
विचारांची रिघ
लागलीये कुठवरी....
खुप काहीतरी
करावस वाटणं..
काहीच न करता
रिकामं बसणं..
मोकळ्या आकाशातही
का जीव गुदमरतोयं...
स्वप्न सजवताना
का मन घाबरतयं...
का मन अस्स देतयं भुल..
की आहे ही......
शुन्यात जमा होण्यची चाहुल.....

....सई


*********************************

आज खोल आत
स्वतःला शोधताना
माझ्यातली "मी" मला गवसतच नाहीये...
हरवलीये मी कुठतरी...
खरच हरवले असेन का?
की लपुन बसली असेन
माझ्यातली मी....
माझ्यातच....
भावनांची रांगोळी झालीये
सगळे रंग एकत्र मिसळलेत
वरवर सगळं रंगीत वाटतयं..
पण...
सुखोत्सव असो
वा दुखःची वरात...
काहीच वाटत नाही...
भावनाशुन्य होण्याची
हिच लक्षणं आहेत का?..

....सई

********************************

वास्तवाची जाणीव
घेऊन जगतेयं खरी...
पण भावनांची उणीव
मात्र भासतेय कुठेतरी ...
उणईव नसेल ती
कारण......
वास्तवाशी खेळताना...
यांत्रिकपणे जगताना...
भावनाही गुदमरुन
मेल्या असाव्यात कदाचित...
खरच मेल्या असाव्यात का भावना...
ओलावाच जाणवत नाहीये कुठे...
अगदी खोल मनात गेलं तरी....

....सई

Saturday, August 15, 2009

तुझी आठवण

अनामिक ओढ
नीरव अशा सांजवेळी,
श्वासा-श्वासासोबत
तुझेच नाव...
मनाला लागलेली
वेडी हुरहुर...
सहनतेच्या पलिकडे
जाऊन वाट बघणार...
पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच
धाव घेणारं...
माझ्याही ताब्य़ात न राहीलेलं..
माझ्यापासुन दुर होऊन
केव्हाचच तुझ झालेलं
आणि आता विरहात,
रडणारं....
अबोलीच फ़ुल झालेलं..
एककी झालेल माझ मन....
याच एका प्रश्नात,
"तुलाही येत असेल रे माझी इतकीच आठवण???"

...सई

Sunday, August 9, 2009

ये दिल always मांगे more...!!!

सार काही वेळेवर,सुखदायक काय म्हणतात ते without tension होत असतानाही...मनाला गप्प अस बसवतच नाही.उधाणलेलंच असत सतत....सारं काही ठीक चाललेल असताना उगाच घोडे उधळावेत तसेच हे स्वप्नांचे ताशेरे उधळतं...गुरफ़टण्याची हौस उगाचची लागलेली असते अन त्यामुळेच साध सरळ चाललेल आयुष्य उगाच complicated होऊन बसतं,कुठतरी कळत असत नाही जे वागतोय ते चुकीच आहे पण नाही...मनाला हे सार कळत पण वळत मात्र नाही.आणि म्हणुनच चांदण्यांनी भरलेल आभाळ असुनही ते रितच भासत राहत...आणि ते भरण्याचा उगाचचा प्रयत्न चाललेला असतो...ये दिल ना always want more यार...!!!

जे काही जवळ आहे त्यापेक्षा नेहमीच जास्त हवं असतं,मग जवळ असलेलं पुरेस का असेना.एखादी गोष्ट पुर्ण आपल्याकडे असताना काहीच अडत नसतानाही अजुन चांगलच का हव असतं...याच शोधात भरकटत मन सतत...सतत मृगजळाच्या मागे धावण्यात काय मजा येते देव जाणे.

कधी कधी तर आपल्याला हवी असलेली गोष्ट कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला मिळणार नाही हे माहीत असुनही त्याच गोष्टीचा विचार करत मन उगाच गुंतत जात.आणि मग नाही मिळाली ती गोष्ट की उगाचच कुढत बसतं.

नात्यांचही तसच आहे,समोरची व्यक्ती आपल्या मनासारखी वागत नाही अस आपण नेहमीच म्हणतो पण,ती व्यक्ती कितीही चांगलं वागली तरी आपल्याला काहीतरी जास्तच हवं असतं.यातुनच मग अबोला,रुसवे,भांडणं आणि तंटे हा गुंता निर्माण होतो आणि तो सोडवताना पुन्हा आपलीच ओढाताण होते.

एखादा आभाळाएवढं प्रेम देणारा जरी असेल ना तरी प्रेम घेणार्या व्यक्तीला ते आभाळापेक्षा तसुभर का होईना पण जास्तच हव असतं,या मनाला नेहमी आहे त्यापेक्षा काहीतरी जास्तच हव असतं.

नसीब से ज्यादा और वक्त से पहले
कुछ हासिल तो नही होगा
ये मालुम होके भी..क्यु??
ये दिल always मांगे more...!!!