Sunday, November 15, 2009

भावनाशुन्य

कधीतरी शुन्यात जातं मन....अगदीच काही न केल्यामुळे...नाहीतर खुप काही केल्यामुळे....


मनात खोल खोल
दडलयं काहीतरी...
विचारांची रिघ
लागलीये कुठवरी....
खुप काहीतरी
करावस वाटणं..
काहीच न करता
रिकामं बसणं..
मोकळ्या आकाशातही
का जीव गुदमरतोयं...
स्वप्न सजवताना
का मन घाबरतयं...
का मन अस्स देतयं भुल..
की आहे ही......
शुन्यात जमा होण्यची चाहुल.....

....सई


*********************************

आज खोल आत
स्वतःला शोधताना
माझ्यातली "मी" मला गवसतच नाहीये...
हरवलीये मी कुठतरी...
खरच हरवले असेन का?
की लपुन बसली असेन
माझ्यातली मी....
माझ्यातच....
भावनांची रांगोळी झालीये
सगळे रंग एकत्र मिसळलेत
वरवर सगळं रंगीत वाटतयं..
पण...
सुखोत्सव असो
वा दुखःची वरात...
काहीच वाटत नाही...
भावनाशुन्य होण्याची
हिच लक्षणं आहेत का?..

....सई

********************************

वास्तवाची जाणीव
घेऊन जगतेयं खरी...
पण भावनांची उणीव
मात्र भासतेय कुठेतरी ...
उणईव नसेल ती
कारण......
वास्तवाशी खेळताना...
यांत्रिकपणे जगताना...
भावनाही गुदमरुन
मेल्या असाव्यात कदाचित...
खरच मेल्या असाव्यात का भावना...
ओलावाच जाणवत नाहीये कुठे...
अगदी खोल मनात गेलं तरी....

....सई

Saturday, August 15, 2009

तुझी आठवण

अनामिक ओढ
नीरव अशा सांजवेळी,
श्वासा-श्वासासोबत
तुझेच नाव...
मनाला लागलेली
वेडी हुरहुर...
सहनतेच्या पलिकडे
जाऊन वाट बघणार...
पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच
धाव घेणारं...
माझ्याही ताब्य़ात न राहीलेलं..
माझ्यापासुन दुर होऊन
केव्हाचच तुझ झालेलं
आणि आता विरहात,
रडणारं....
अबोलीच फ़ुल झालेलं..
एककी झालेल माझ मन....
याच एका प्रश्नात,
"तुलाही येत असेल रे माझी इतकीच आठवण???"

...सई

Sunday, August 9, 2009

ये दिल always मांगे more...!!!

सार काही वेळेवर,सुखदायक काय म्हणतात ते without tension होत असतानाही...मनाला गप्प अस बसवतच नाही.उधाणलेलंच असत सतत....सारं काही ठीक चाललेल असताना उगाच घोडे उधळावेत तसेच हे स्वप्नांचे ताशेरे उधळतं...गुरफ़टण्याची हौस उगाचची लागलेली असते अन त्यामुळेच साध सरळ चाललेल आयुष्य उगाच complicated होऊन बसतं,कुठतरी कळत असत नाही जे वागतोय ते चुकीच आहे पण नाही...मनाला हे सार कळत पण वळत मात्र नाही.आणि म्हणुनच चांदण्यांनी भरलेल आभाळ असुनही ते रितच भासत राहत...आणि ते भरण्याचा उगाचचा प्रयत्न चाललेला असतो...ये दिल ना always want more यार...!!!

जे काही जवळ आहे त्यापेक्षा नेहमीच जास्त हवं असतं,मग जवळ असलेलं पुरेस का असेना.एखादी गोष्ट पुर्ण आपल्याकडे असताना काहीच अडत नसतानाही अजुन चांगलच का हव असतं...याच शोधात भरकटत मन सतत...सतत मृगजळाच्या मागे धावण्यात काय मजा येते देव जाणे.

कधी कधी तर आपल्याला हवी असलेली गोष्ट कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला मिळणार नाही हे माहीत असुनही त्याच गोष्टीचा विचार करत मन उगाच गुंतत जात.आणि मग नाही मिळाली ती गोष्ट की उगाचच कुढत बसतं.

नात्यांचही तसच आहे,समोरची व्यक्ती आपल्या मनासारखी वागत नाही अस आपण नेहमीच म्हणतो पण,ती व्यक्ती कितीही चांगलं वागली तरी आपल्याला काहीतरी जास्तच हवं असतं.यातुनच मग अबोला,रुसवे,भांडणं आणि तंटे हा गुंता निर्माण होतो आणि तो सोडवताना पुन्हा आपलीच ओढाताण होते.

एखादा आभाळाएवढं प्रेम देणारा जरी असेल ना तरी प्रेम घेणार्या व्यक्तीला ते आभाळापेक्षा तसुभर का होईना पण जास्तच हव असतं,या मनाला नेहमी आहे त्यापेक्षा काहीतरी जास्तच हव असतं.

नसीब से ज्यादा और वक्त से पहले
कुछ हासिल तो नही होगा
ये मालुम होके भी..क्यु??
ये दिल always मांगे more...!!!

Thursday, July 2, 2009

पत्रास कारण की,

"सखे तुला माझ्यापेक्षा चांगला कुणी भेटला असता असा कधी तु विचार केलायस का ग?????"असा प्रियचा प्रश्न ऎकुन सखी थोडी चकीतच झाली...याला काय झालं मधेच असा भाव तिच्या चेहर्‍यावर आला...आता हे भाव त्याला दिसत नव्हतेच कारण नेहमीप्रमाणे संभाषण फ़ोनवर सुरु होतं.....तिनं त्यावेळी तो विषय टाळला...पण नंतर ऑफ़िसवरुन घरी आल्यावर थोडा निवांत तिनही त्याच्या त्या प्रश्नावर विचार करायला सुरुवात केली...आणि उत्तराखातर प्रियला पत्र लिहायला घेतलं.

प्रिय,
कसा आहेस?सहजच वाटलं पत्र लिहावसं....आता म्हणशील रोज तर बोलतो फ़ोनवर मग मधेच पत्र लिहीण्याची लहर(सवड) कशी काय मिळाली बुआ....असो....रोज कितीही बोललो म्हणजे मला मान्य आहे हल्ली आपण पुर्वीसारखं बोलत नाही तरीही.....काही गोष्टी बोलुन सांगण्यापेक्षा मला वाटलं आज पत्रातुन व्यक्त व्हावं...त्यामुळे आता आश्चर्याचे भाव ओसरू द्यावेत अन थोडं नॉर्मल होऊन पत्र वाचवं....

तर पत्र लिहीण्यास कारण की,
आज तुम्ही बोलता बोलता एक प्रश्न विचारलात की,""सखे तुला माझ्यापेक्षा चांगला कुणी भेटला असता असा कधी तु विचार केलायस का ग?????"तेव्हाचा माझा चेहरा बघितला असतास ना तर तुलाही माझे ते भाव कळले नसते...असा का प्रश्न तुला पडावा रे?

Practically ह्या प्रश्नाच उत्तर द्यायचं म्हटलं ना तर मला सरळ वाटतं की,ह्या जगात कुणीही परिपुर्ण नसतो,तसच कुणाचाही जोडीदार हा त्याला १०० टक्के अनुरुप कसा मिळू शकतो,एकात जे कमी आहे ते दुसर्‍याने पुर्ण करायच असतं तरच ते नातं परिपुर्ण होऊ शकतं.माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा तु आहेस कधी कधी या गोष्टीचा आपल्या दोघांनाही त्रास होतो पण,माझ्यात जे नाही ते मला तुझ्यात सापडलं किंवा तुझ्यात जे नाही ते तु माझ्यात शोधतोस आणि आपलं नात फ़ुलवतोस परिपुर्ण करण्याचा प्रयत्न करतो हे महत्वाच नाही का? आणि खरं सांगायच तर तुला कुणी परी जरी मिळाली आणि मला कुणी "परा" मिळाला ना तरी तिथही वाद,भांडणं होतच राहणार coz nobody is perfect.

मला कधी असा प्रश्नच पडला नाही कारण तुझं माझ्यावरच असलेलं प्रेम,तुझं मला समजुन घेणं...माझ्या चिडण्याला,माझ्या रागवण्याला bare करणं....jokes apart.....पण खरचं तुझ्यापेक्षा चांगला कुणी मला भेटला असता की नाही देव जाणे पण देवाने माझ्यासाठी उत्कृष्ट असा तुच पाठवला आहेस.(कारण माझी बडबड,चिडचिड तुझ्या व्यतिरिक्त कुणीच सहन करु शकत नाही.)

काळजी घ्यावी...नेहमीप्रमाणे खुप आठवण येतेय तुझी....लव्ह यु....

तुझ्या माझ्या नात्याला, नाही अंतराची बंधनं
नाही दुराव्याचे दुःख...नको स्पर्शाची आस...
नाही झाला संवाद जरी,तरी आहे विश्वासाची वीण,
जी प्रत्येक क्षणासोबत अजुनच घट्ट होतेयं....
कुठलीतरी अनामिक "सय", जुळलीये आपल्यात,
म्हणुनच श्वासागणिक, येते तुझी आठवण....
अन करते मनात...तुझी तुझीच साठवण....

तुझीच वेडी,
सखी.

Sunday, June 21, 2009

पावसाचे आगमन

भरुन आलेलं आभाळ
गारठुन गेलेलं वारं
रिमझिम सरीतुन
"त्याच" हळुच येणं...

चातक होऊन
त्याची वाट पाहीलेली
येण्याने त्याच्या
सारी धरा न्हाहलेली...

उशीरा का होईना
पावसाचे झाले आगमन
त्याच्या येण्यान अशा
चिंब चिंब माझ मन...

.....सई

Sunday, June 7, 2009

"फ़िलहाल जी लेने दे"

हातातुन निसटावी वाळू,
तसे हे कडु-गोड क्षण निसटतायतं...
कुठले जपुन ठेवायचे,
अन कुठले खोडायचे,
याचे हिशोब मांडायलाही,
क्षण अपुरे पडतायत....
धावपळीच्या या आयुष्यात,
काय जगायच...कस्स जगायचं....
हेही वेळ बघुन आपण ठरवतोयं....
व्यवहारी या जगण्यात,
येणारा प्रत्येक क्षण निघुन जातोय....
आपण मात्र तस्सच "मोनोटोनस" जीवन जगतोय.....
उद्या जुनं आठवायला काहीच उरणार नाही....
कुणी विचारलं "काय जगलातं???"...
तर काय उत्तर असणार आहे आपल्याकडे.....
होईल ते होईल पुढे त्यासाठी आज का मरत जगा.....
मी तर आता येणारा प्रत्येक क्षण
मनभरुन आपलासा करुन जगावं म्हणतेय.....
कुणी अडवलं अस जगताना तर आशाताई सारखं म्हणेन....
"ये लम्हा फ़िलहाल जी लेने दे"

....सई