Wednesday, September 17, 2008

चिठ्ठी ना कोई संदेस...

रविवार असल्यामुळे जरासं 'चेंज' म्हणून सगळेचजण आज झोपेतुन लेट उठलो होतो. दररोज ११ वाजेपर्यंत आपापल्या कामांमध्ये मशगूल होणारे आम्ही अजुन मात्र निवांतपणे चहा नाश्ता एँन्जाय करत होतो. जरा वेळाने मम्मीने स्वयंपाकाला सुरुवात केली पण मी आळशी त्यामुळे तिला मदत न करता ऑर्कुटींग करत बसले..आज हक्काचा दिवस आहे असं समजून.

१-२ तास मजेत ऑर्कुटींग झाल्यावर जेवायला गेले. इतक्यात पप्पांचे मित्र सरतापे यांचा फ़ोन आला. पप्पा जेवत होते. सो.. फ़ोन मी उचलला. "पप्पाना फ़ोन दे" इतकचं बोलले सरतापे. त्यांच्या आवाजात कसलसं टेंशन जाणवत होत. मी पप्पांना फ़ोन दिला. "अरे मी या शिवम हॉस्पिटलमधे आहे. शिंदेच्या मुलीला डॉक्टर अँडमिट करायचं म्हणतायत. तु जरा ये. तो घाबरल्यासारखा वाटतोय" असं काहिसं म्हणाले ते.
घाबरणारच ना! कुठलाही पुरुष जेव्हा बाप होतो, तोही मुलीचा तेव्हा तो पुरुष असला तरी हळवा बनतो आणि काळजी करतो, ती एखाद्या स्त्रीपेक्षाही जास्त भावनाप्रधान होऊन. पप्पांनी लगेच हात धुतला आणि तयारी करुन निघाले. मम्मीही गेली पप्पांसोबत.

शिंदेकाका हे आमचे फ़ँमिली फ़्रेंड होते. त्यांची मुलगी, स्नेहा ९ वी मधे शिकायला होती. त्यामुळे आम्हालाही तसं टेंशनच आलं होतं.आणि का कोण जाणे माझ्या मनाला विचित्र भिती वाटली.

थोड्या वेळाने मीही जाणारच होते. घाईघाईने घरातली कामं आटोपत होते तोच पप्पांचा फ़ोन आला, स्नेहा गेली म्हणुन.माझ्या मनाची भिती खरी ठरली. रडु आवरेनासंच झालं. ती एवढुशी स्नेहा डोळ्यासमोर आली. तिचं बोलणं, तिचं वागणं सगळ्या आठवणी आठवल्या.काल-परवा डोळ्यासमोर असणारी व्यक्ती अशी अचानक गेली यावर विश्वासच बसेना.आणि हुंदकेही आवरेना.

कसं ना माणसाचं काहीच सांगता येत नाही कधी काय होईल ते. फ़क्त उलटी आणि तापाचं निमित्त झालं आणि स्नेहा हे जग कायमच सोडून गेली.

कुणी वारलं ओळखीतलं किंवा अनोळखी जरी...म्हणजे मरणाची बातमी मग ती कुणाचीही असो कशीही कानावर आली तरी का कुणास ठावुक लगेच माझ्या मनात विचार येतो की उद्या मीही अशीच चालता बोलता निघून गेले तर? कधी ना कधी मी मरणार तर आहेच. पण तरीही असा विचार येतो आणि खुप वेळ मी हाच विचार करत बसते.

मी मेले तर सगळ्यात जास्त कोण रडेल?
कोणाला सगळ्यात जास्त वाईट वाटेल?

तसं कुणाचं फ़ार काही अडेल असं नाहीये. पण तरीही माणसाचं मनंच असं, 'आपल्यावाचुन कुणाचं काहीच अडत नाही' हा विचारही किती त्रास देतो नाही का? माझंही तसंच. मीही एक सर्वसामान्यचं आहे ना.
आज तसंच काहीसं झालं.

"चिठ्ठी ना कोई संदेस...
जाने वो कोनसा देस,
जहाँ तुम चले गये..."

हे जगजीतचं गाणं ऎकताना विचार भरकटायला लागले. आधी फ़क्त एक गाणं म्हणुन ऎकल आणि मग जेव्हा मन लावुन ऎकल तेव्हा त्याचा प्रत्येक शब्द घुसत गेला मनात.

न राहवुन मी सख्याला विचारलं 'तु हे गाणं ऎकलयसं का?' तर तो म्हणाला की 'हे गाणं तर मला पाठ आहे' आणि त्याने चक्क गायला सुरुवात केली. तसा त्याचा आवाज बराच आहे, म्हणजे माझ्यापेक्षा तरी.
त्याने गायला सुरुवात केली आणि

" एक आह भरी होगी..
हमने ना सुनी होगी,
जाते जाते तुमने
आवाज तो दी होगी......"

हे ऐकताना खरंच अस वाटलं की मी मेलेयं आणि तो हे गाणं गातोय. नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण तेव्हा मी काहीच न बोलता विषय लगेच बदलला. फ़ोन ठेवल्यावर मात्र मला खरंच असं वाटलं की,
मी उद्या मेले तर काय वाटेल याला?
तो लगेच विसरु शकेल का मला?
त्याला दुसरं कुणी आवडेल का माझ्याइतकं?
दुसर्‍या कुणावर तो माझ्यावर करतो तितकच प्रेम करेल का?

संध्याकाळी त्याने फोन केल्यावर तो काही बोलण्याच्या आतंच मी त्याला विचारलं, "उद्या मी मेले तर तु काय करशील?? " मी अचानक विचारलेल्या कुणाचाही गोंधळ उडवणार्‍या प्रश्नाने तोही गोंधळला असावा हे खरं.माझ्या इतर खुळचट प्रश्नाइतकाच हा प्रश्नही त्याला खुळचटच वाटला असावा.

तो म्हणाला, "हे काय बरळते आहे काहिही".
पण मी त्याचं वाक्य मध्येच तोडून त्याला विचारलं, "सांग ना रे? काय करशील?

"त्याने एक बराच मोठा पॉझ घेतला आणि त्याच्या लक्षात आलं की त्या गाण्यामुळेच मी असं काहीसं विचारतेय ते. एक मोठा उसासा टाकत तो म्हटला, "तु गेल्यावर त्यानंतरचा प्रत्येक दिवस जगायचा म्हणून जगेन मी. सतत हाच विचार करेन की लवकर हे आयुष्य आटपुया आणि सईकडे जाउया ती तिथं माझ्याविना एकटी़च असेल."

म्हणजे इनशॉर्ट, तोही हेच म्हणाला की तु गेल्यावर तसं काही अडणार नाही माझं.... जगेन मी..... फक्त तुझ्या सहवासामुळे लागलेल्या सवयी त्रास देतील. तुझी खुप आठवण येईल. ज्या ज्या वेळेला आपण बोलायचो फोनवर ती वेळ फार छळेल मला तु गेल्यावर. तुझ्या कवितेतून तुझ्या शब्दातून आठवत बसेन तुला.

माझीही अपेक्षा नव्हतीच की त्यानं रडावं, मी गेल्यावर सगळं सोडून देवदास व्हावं अशी. त्यानं खरंच खुप Practical उत्तर दिलं आणि तेच बरोबर होतं. कारण कुणा एका व्यक्तीमुळे आपण हे आपलं आयुष्य जगतोय असं कधीच होत नाही. त्यामुळे कुणी गेल्यावर सगळं संपल असही होत नाही. फक्त त्या व्यक्तीची कमतरता मात्र जाणवते आणि जाणवावीच खर तर.आपण माणुस आहोत आणि खरं म्हणजे आपल्याला मन नावाची गोष्ट देवाने देऊ केलीये हे यावरून कळतं.नाहीतर माणुस आणि जनावर यात फरक तो काय.

म्हणुनच माझी एक माफक आणि छोटीशी अपेक्षा आहे की, मी गेल्यावर माझ्या जवळच्या माणसांनी मी गेल्याच्या दुःखात सगळं सोडून फक्त माझीच आठवण काढत रडत बसावं असं नाही... तर फक्त कुठेतरी, कधीतरी मला, माझ्या आठवणींना, माझ्यासोबत घालवलेल्या चार-दोन क्षणांना आठवावं... एवढचं....

" मेरे जाने पर,
याद ना करना हर वक्त मुझको
पर तुम मुझे भुला न देना
यही ख्वाहीश है मेरी,
जब भी याद आये कुछ पल साथ गुजारे
तब दो आसुही बहा देना"


......सई(सुप्रिया पाटील)

7 comments:

Amol said...

aawdli post...
kuthe tari vachlela ek sher aathavla

hum unse apni mohabbat ka izhaar isliye nahi karte hain
kyunki hum unki "HAAN" ya "NAA" se darte hain
agar unhone "HAAN" keh diya to hum khushi ke mare jayenge
aur agar unhone "NAA" keh diya to hum ro-ro kar mar jayenge
aisa nahi ki hum apni maut se darte hain
hamari maut par na beh jayen unke do aansu
hum unke un do aansuon ki kadar karte hain
isliye aur sirf isliye hum unse
apni mohabbat ka izhaar nahi karte hain.....................

devrai said...

apratim....aavadali khup..

Anonymous said...

kharach shabdach nahiyet sups.....
sunder[:)]

संदीप सुरळे said...

खरं आहे, कुणावाचून कुणाचं अडत नाही काही, पण फरक मात्र पडतो. खूप फरक पडतो. त्या एका क्षणात सगळं बदलून जातं. जाणार निघून जातं पण खरं सोसायला लागतं ते पाठीमागे राहणार्याला. सारं असून काहीच नसल्याचं जाणवत राहतं, आणि सगळं असलं तरी त्या कुणातरीशिवाय ते अपुर्ण वाटत. जीवन अपुर्ण वाटतं.

हे गाणं मलाही आवडतं, विषेश करून या ओळी.

अब यादों के काटे इस दिल मे चुभते है,
ना दर्द ठहरता है, ना आसू रुकते है,
तुम्हे ढुंढ रहा है प्यार हम कैसे करे इकरार ,
के हा तुम चले गये...

लेख आवडला.
एक आगळा वेगळा लेख. मानलं तुला.

सुप्रिया.... said...

Thanx Amol,Sneha,Sonal and sandip

चैताली आहेर. said...

सये.......!!!

Swapnil said...

Chimne,

Kaay ga... You change my mood.
Chaan lihilas...faar touching aahe & I started thinking abt Life without me.