Tuesday, December 2, 2008

स्वप्न..

आपल्या स्वप्नांना
वाट मिळालीच नाही.....
विरहाच्या या रातीची
पहाट कधी झालीच नाही....
आजही लाटच आहे मी...
फ़रक इतकाच.....
पुर्वी येऊन भेटायचे तुला...
अन आता किनाराच
वेगळा लाभलाय मला....
पण अजुनही तुच आठवतोस...
कुठतरी खोलवर वादळ होऊन धुमसतोस....
पौर्णिमेचा चंद्र पाहताना...
रातराणी धुंद बहरताना...
वळवाच्या पावसात भिजताना....
अजुनही तुझी आठवण येतेच....
तुही अजुन विसरला नाहीस ना मला..?
माहीतेय....त्याच क्षणात अडकलायसं....
बांधुन ठेवल्यासारखा.....की बांधुन घेतल्यासारखा..?

....सई

1 comment:

Abhi said...

भावपूर्ण शब्द !!!