Monday, May 12, 2008

...विचार...

विचार..... बाई गं...कधीच पाठ सोडत नाहीत कोणाची...
कसला ना कसला विचार चालुच असतो प्रत्येकाच्या मनात....कोणी अभ्यासचा विचार करतं... तर कुणी नोकरीचा....कुणी मुलाबाळांचा तर कुणी बायकोचा......कुणी फ़क्त स्वताचा ,तर कुणी निःस्वार्थी होउन फ़क्त दुसर्‍यांचा..आणि एखाद्याला विचार करायला काहीच विषय नसेल तर दुसरं कुणी कसला विचार करतयं याचाचं विचार पडलेला असतो.... विचार करायला विषय कधी कमी पडलेच नाहीत माणसाला.... शांतता तर अजिबात नाही मनाची....नेहमी आपली गर्दी विचारांची....ही विचारांची शृंखला कधी थांबायचं नावचं घेत नाही मुळी.....नुसता आपला कसला ना कसला विचार....कंटाळा येतो बाई विचारांचा...सोडा ना कधीतरी शांत,निवांत...पण नाही.... असं कधी होतचं नाही...
म्हणतात बुआ....ही विचारांची शॄंखला म्हणे झोपल्यावर थांबते...खरचं का????
मला नाही वाटत असं.....
झोपतं ते फ़क्त शरीर....विचार तर छळतातचं की मनाला....स्वप्नांच्या रुपात....हो ना??????

..........सई(सुप्रिया पाटील)

No comments: