Thursday, February 24, 2011

"आठवण"

आजुबाजुला सारचं....
शांततेत ...अगदीच निस्तब्ध असताना.....
मनही नि:शब्द होऊन जातं....
बरच काही बोलायला असुनही,
काहीच सुचत नसल्यासारखं.....
यालाही कारण तूच आहेस....
तुझ्या आठवणीच याला जबाबदार....
ढगाळलेलं आकाश....
पावसाची सततची लागलेली रिघरिघ....
बाहेर दिसणारा काळोख....
अशावेळी.....अशावेळी,
खिडकीच्या थंड झालेल्या गजांनाही,
स्पर्श करावासा वाटत नाही.....
कारण,
तुझ्या आठवणींच्या जगात हरवलेल्या मला
त्या स्पर्शानं दचकुन जाग येईल याची भितीच वाटते....
तुझ्या आठवणींना कवटाळुन झोपी जावं
अन त्याच्यांच कुशीत जागही यावी ...
तु जवळ नसताना आठवणींचीच ऊब घ्यावी....

....सई

No comments: