Monday, October 4, 2010

तुजवाचुन जन्मच अडतो.

प्रिय सख्या,

तुझ्यात इतकं कधी गुंतले हे कळलचं नाही रे! माझ्यासारखी चंचल,अल्लड,चिडचिड करणारी,नको तेवढीpractical,straight forward व्यक्ती कुणावर इतकं प्रेम कशी करु शकते हाच विचार येतो हल्ली मला.

खरंच प्रेमात पडल्यावर माणूस संपुर्ण बदलतो याचा मला नव्यानं साक्षात्कार होतोय,म्हणजे तीन वर्षापुर्वी तुझ्याप्रेमात नुकतेच पडलेली मी आणि आजची मी यात जमिन-अस्मानाचा फ़रक जाणवतोय.

जशी मैत्री दिवसेंदिवस मुरते तस्सच आपलं प्रेम दिवसेंदिवस मुरतयं. प्रत्येक दिवशी प्रेमाची नवी छटाजाणवतेयं,नवा अर्थ कळतोयं.असं म्हणतात(प्रेम कधीच केलेले लोक) की काही दिवसांनी कंटाळा येतो तेच तेचगोड-गोड बोलण्याचा,भांडण्याचा.पण मला वाटत की जितकं जास्त आपण समोरच्या व्यक्तीला जाणतो ओळखतोतितकच त्या व्यक्तीबद्दलच प्रेम ओढ जास्त प्रमाणात वाटते.

आपण दोघं एकमेकांपासुन इतके दूर राहूनही एकमेकांबद्दलची सय अगदी तशीच पुर्वीसारखीच. खरतर पुर्वीपेक्षाहीजास्त वाढलीये.


तुझ्या माझ्या नात्याला,
नाही अंतराची बंधनं,
नाही दुराव्याचे दुःख,
नको स्पर्शाची आस.
नाही झाला संवाद जरी,
तरी आहे विश्वासाची वीण,
जी प्रत्येक क्षणासोबत
अजुनच घट्ट होतेयं....
कुठलीतरी अनामिक "
सय"
जुळलीये आपल्यात
म्हणुनच श्वासागणिक,
येते तुझी आठवण....
अन करते मनात
तुझी तुझीच साठवण....


तु विचार करत असशील आज इतकं सगळं सांगाय्ची गरज का वाटली हिला?आला ना हा प्रश्न मनात??

खरतरं मी इतकी बडबड करते,सगळ्या लहानातल्या लहान गोष्टी तुला सांगते कधी कधी फ़टकळपणे तुला काहीहीबोलते.पण मनापासुन मनातलं असं मनमोकळेपणाने बोलतच नाही.

आजही नेहमीप्रमाणे मी चिडचिड केली आणि तुझ्या "माझ्याशिवाय जगु शकशील का?" या प्रश्नावर अगदीखडुससारखं "हो" अस उत्तर दिलं.

पण खरं सांगु का मनात खड्डाच पडला होता.आताही विचार करुनही कसंसच होतयं.

मी इतके practical पणाचे उपदेश देते की कुणाचं कुणावाचुन काही अडत नाही. सगळंव्यवस्थित चालतं, वगैरे...पण तुझ्याशिवाय मी हा विचार जरी केला तरी इतकं काही भांबावुनजायला होतं की बास.

तु भारतातुन परत अमेरिकेला जाताना २४ तास माझ्याशी बोलला नाहीस तेव्हाही असच झालं होत.खुप काहीतरीचुकतयं असं!


खरचं,

श्वासही अडखळतो

जीव सतत तुटतो

सख्या रे,

तुजवाचुन जन्मच अडतो !



तुझीच,

सई

1 comment:

संदीप सुरळे said...

सये, इतकंही प्रेम करु नये कुणावर!